सौ.सिमा अमोल सूर्यवंशी यांची नांद्रा सरपंच पदी बिनविरोध निवड

सौ.सिमा अमोल सूर्यवंशी यांची नांद्रा सरपंच पदी बिनविरोध निवड

बातमी सेवा ( राजेंद्र पाटील नांद्रा )
नांद्रा(ता.पाचोरा)ता.२० येथील सरपंच श्रीमती आशाबाई तावडे यांनी आपल्या ठरल्याप्रमाणे दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याने सरपंच पदाच्या राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी आज सरपंच पदांची निवड पार पडली.यात सौ.सिमा अमोल सुर्यवंशी यांचा सरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी मंडळाधिकारी प्रशांत पगार, ग्रामसेविका अनिता सपकाळे यांनी काम पाहिले.यावेळी माजी सरपंच श्रीमती आशाबाई तावडे, उपसरपंच शिवाजी तावडे, सदस्य अनिल खैरनार, योगेश सुर्यवंशी, कल्पना तावडे,ललीता सोनवने, निर्मला पिंपळे, आशाबाई बाविस्कर, सुनिता पाटील,रेखाताई सुर्यवंशी होते.यावेळी माजी सरपंच सुभाष तावडे, विनोद तावडे,अमोल सूर्यवंशी, माजी सभापती नितीन तावडे, जि.प.सदस्य पदमबापु पाटील, माजी सभापती पंढरीनाथ पाटील,भाऊसाहेब बाविस्कर,बालु सुर्यवंशी,आनंदा बाविस्कर , प्रमोद सुर्यवंशी, नारायण तावडे, पितांबर तावडे , संदीप सुर्यवंशी, शशीकांत सुर्यवंशी, आसनखेडा उपसरपंच कल्पेश पाटील, पोलिस पाटील किरण तावडे,राहुल सुर्यवंशी, गुलाब पाटील,सागर तावडे, अनिल बोरसे, विशाल तावडे पत्रकार राजेंद्र पाटील,नगराज पाटील,प्रा.यशवंत पवार यांच्या ग्रामस्थ उपस्थित होते.