शेती, सेवा आणि स्वावलंबनाचा संगम : बाबरुड येथे “सुनिल कोळी यांचे अत्याधुनिक ऑनलाईन कृषी सेवा केंद्र” सुरू

शेती, सेवा आणि स्वावलंबनाचा संगम : बाबरुड येथे “सुनिल कोळी यांचे अत्याधुनिक ऑनलाईन कृषी सेवा केंद्र” सुरू

 

 

 

बाबरुड (ता. पाचोरा | प्रतिनिधी)

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या दैनंदिन अडचणी, वेळेची नासाडी आणि आधुनिक सुविधांचा अभाव यावर ठोस व परिणामकारक उत्तर देणारा उपक्रम बाबरुड (रा.) येथे प्रत्यक्षात साकार झाला आहे. पत्रकार सुनिल कोळी यांनी “शेतीला जोडधंदा” या संकल्पनेतून सुरू केलेले अत्याधुनिक ऑनलाईन कृषी व आर्थिक सेवा केंद्र म्हणजे ग्रामीण स्वावलंबनाच्या दिशेने उचललेले ठाम आणि प्रेरणादायी पाऊल ठरत आहे.

आजही शेतीसाठी लागणारी औजारे, विविध ऑनलाईन सेवा तसेच पैसे काढणे–भरणे यासाठी शेतकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी धाव घ्यावी लागते. या धावपळीत वेळ, पैसा आणि श्रम वाया जातात. हीच गरज अचूक ओळखून सुनिल कोळी यांनी गावातच सर्व सुविधा – एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.

या केंद्रामार्फत उपलब्ध होणाऱ्या प्रमुख सेवा :

➡️ शेतीसाठी लागणारी औजारे ऑनलाईन मागणी व सेवा

➡️ शेतकरी व नागरिकांसाठी सुरक्षित, विश्वासार्ह आर्थिक सेवा

➡️ पैसे काढणे, भरणे व डिजिटल व्यवहारांची सोय

➡️ ग्रामीण भागात डिजिटल सेवांचा सुलभ आणि मार्गदर्शित वापर

या सेवा केंद्राचे उद्घाटन गोविंदा कोळी यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. यावेळी निवृत्त न्यायाधीश दयाराम कोळी, न्यायाधीश मंगेश कोळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

“ग्रामीण भागात अशा प्रकारची सेवा केंद्रे उभी राहिल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल आणि डिजिटल इंडिया ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होईल,” असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

संपादकीय दृष्टिकोनातून पाहता…

हे केंद्र केवळ व्यवसायापुरते मर्यादित नसून, सेवा, सामाजिक बांधिलकी आणि ग्रामीण विकास यांचा त्रिवेणी संगम आहे. पत्रकारितेच्या जोडीला समाजोपयोगी उपक्रम राबवून सुनिल कोळी यांनी ग्रामीण तरुणांसमोर एक सकारात्मक आणि प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे.

बाबरुड व परिसरातील शेतकरी व नागरिकांना आवाहन :

शेतीसाठी लागणाऱ्या सुविधा, ऑनलाईन औजारे आणि आर्थिक सेवांसाठी आता बाहेरची धावपळ नको.

आपल्या गावातच उपलब्ध असलेल्या सुनिल कोळी यांच्या ऑनलाईन कृषी सेवा केंद्राचा लाभ घ्या.

👉 गावाचा विकास, शेतकऱ्याचा विश्वास आणि आधुनिकतेची जोड — हेच या केंद्राचे ब्रीदवाक्य आहे.

याप्रसंगी राकेश कोळी, पत्रकार प्रवीण मिस्त्री, पत्रकार राजेंद्र खैरनार, अतुल कोळी, अनिल तडवी, पत्रकार शिवाजी सुतार, किरण सूर्यवंशी, रमेश चौधरी, युवराज वाघ, संभाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य, तुषार आढाव, गुलाब तडवी, राजू गवहाडे, मनोज वाघ, अशोक सूर्यवंशी, शंकर डारकोंडे, किरण पवार, राजू काले, जयराम जगताप, सुरेश सालुंके, रविंद्र वाणी, मधुकर वाणी, सुरेश गव्हाडे, चंद्रकांत सालुंके, राहुल बडगुजर, विजय सालुंके, संजय वाघ यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.