“आदिवासी भिल्ल समाज बांधवांच्या नवीन रेशन कार्डचे प्रस्ताव तहसीलदार पाचोरा यांच्याकडे केलेत दाखल”

“आदिवासी भिल्ल समाज बांधवांच्या नवीन रेशन कार्डचे प्रस्ताव तहसीलदार पाचोरा यांच्याकडे केलेत दाखल”

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरे परिसर तथा बांबरुड ,राणीचे परिसरातील आदिवासी भिल्ल समाज बांधवांना नवीन रेशन कार्डचे प्रस्ताव माननीय सौ वैशालीताई सूर्यवंशी शिवसेना नेता पाचोरा यांनी तसेच शरद पाटील तालुकाप्रमुख पाचोरा यांच्या समवेत माननीय तहसीलदार पाचोरा यांच्याकडे दिनांक 06/10/23 रोजी दुपारी 1.00 वाजता पाचोरा येथे सादर केले.
आदिवासी भिल समाज बांधव हे मूळ रहिवासी असून कष्ट करून उपजीविका भागवतात ते भूमिहीन आहेत ते शिक्षणापासून वंचित आहे प्रचंड दारिद्र्य त्यांच्या जीवनात आहे ते मतदार आहेत नेहमी निवडणुकांमध्ये स्वयंस्फूर्तीने मतदान करतात तरीदेखील आज पावेतो ते रेशन कार्ड पासून वंचित आहे त्यांना शासनाच्या धान्य दुकानाच्या लाभापासून दूर ठेवले आहे हा अशम्य अपराध आहे शासन आणि प्रशासनाचा बेजबाबदारपणा व त्यांच्या विषयी असलेली उदासीनता अत्यंत निंदनीय आहे त्यांच्या हक्कावर गदा आहे त्यांचा हक्क त्यांना मिळावा उदरनिर्वाहासाठी अन्नधान्याचा पुरवठा व्हावा त्यांना पोटभर जेवण मिळावे या सामाजिक बांधिलकीतून माननीय वैशालीताई सूर्यवंशी यांनी मा.तहसीलदार प्रवीण चव्हाणके तथा श्री येवले साहेब यांची भेट घेऊन पिंपळगाव हरे सामनेर डोकल खेडा वरसाडे लासुरे आधी अनेक गावातील नवीन रेशन कार्ड व प्राधान्य अन्नपुरवठा योजनेअंतर्गत समावेश करण्यासाठीचे प्रकरणांचे प्रस्ताव सादर केलेत तातडीने निर्णय घेऊन आदिवासी भिल्ल समाज बांधवांना त्यांच्या हक्काचे रेशन कार्ड द्यावेत असे सांगितले यावेळी श्री एकनाथ अहिरे दत्तू अहिरे संजय ठाकरे नंदू पाटील नाना वाघ धरमसिंग पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.