बहूळाचे रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन सुटले कोरडवाहू शेतकऱ्यांना रब्बी साठी होणार फायदा

बहूळाचे रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन सुटले
कोरडवाहू शेतकऱ्यांना रब्बी साठी होणार फायदा

राजेंद्र पाटील
नांद्रा(ता.पाचोरा)ता.20रोजी रोजी सकाळी11 वाजता आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते वेरुळी येथील बहुळा धरणाचे पाणी शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन सोडण्यात आले.गेल्या तिन वर्षांपासून बहूळा धरण हे सलग तिसऱ्यांदा शंभर टक्के भरल्याने यंदा शेतीसाठी तीन आवर्तन सोडण्यात येणार आहेत.या मुळे हडसन, वडगाव,दुसखेडा,नांद्रा,लासगाव,सामनेर,वेरुळी, खेडगाव येथील शेतकऱ्यांना रब्बी साठी व कोरडवाहू शेतीला फायदा होणार आहे. वेळेवर सुटलेल्या या आवर्तनामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांच्या रब्बी च्याआशा पल्लवित झाल्या आहेत. यावेळी जि.प.सदस्य पदमबापु पाटील, माजी सभापती पंढरीनाथ पाटील, शरद पाटील,नांद्रा उपसरपंच शिवाजी तावडे, प्रमोद सुर्यवंशी, प्रविण ब्राम्हणे,स्विय सहाय्यक राजेश पाटील अवी पाटील (लासगाव), संदीप पाटील (खेडगाव), भगवान पाटील (सरपंच वेरुळी),बाळू पाटील, अशोक पाटील, ब्रिजलाल संघवी, कैलास पाटील,अभिमन बाविस्कर, शशी महाजन, अनिल द्यावे, संदीप राजपूत, योगेश पाटील,बंडू सोनार . बहूळाचे उपविभागीय अभियंता राहुल शेवाळे, शाखा अभियंता श्री देशमुख, कालवा निरीक्षक के.एल.शिंदे,पाटकरी शिवदास महाजन, रमेश पाटील यांच्या सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज 20किव्सेस पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे.जशीजशी शेतकऱ्यांची मागणी वाढेल तसतसे पाणी सोडण्यात येईल. राहुल शेवाळ उपविभागीय अभियंता बहूळा मध्यम प्रकल्प पाचोरा.
वेरूळी(ता.पाचोरा)बहूळा मध्यम प्रकल्पातून रब्बी चे पहिले आवर्तन सोडण्यात आमदार किशोर आप्पा पाटील, पदमबापु पाटील, पंढरीनाथ पाटील, शिवाजी तावडे, उपविभागीय अभियंता राहुल शेवाळे शाखा अभियंता श्री देशमुख आदी.