शहरासह तालुक्यातील व्यावसायिकांनी कोरोना टेस्ट करणे अनिवार्य – आमदार किशोर पाटील

शहरासह तालुक्यातील व्यावसायिकांनी कोरोना टेस्ट करणे अनिवार्य
– आमदार किशोर पाटील

*पाचोरा प्रतिनिधी*
संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना पुन्हा एकदा आपले तोंड वर करत आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाय योजना प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. या संदर्भात दि. १२ रोजी पाचोरा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांचे अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत येत्या पाच दिवसात शहरासह ग्रामिण भागातील लहान – मोठ्या व्यावसायिकांनी आपली कोरोना चाचणी करणे अनिवार्य, लग्न सोहळ्यात जास्तीत जास्त १०० वऱ्हाडी अपेक्षित तसेच एखाद्या व्यक्तीची कोरोना चाचणी पाॅझिटीव्ह आली असल्यास त्याचे कुटुंबियांना घरातच कोरोन्टांईन करुन शेजाऱ्यांनी त्यांना घरा बाहेर पडु देवु नये, अशा प्रतिबंधात्मक उपाय योजनांबाबत निर्णय घेण्यात आला. बैठकीत उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील, तहसिलदार कैलास चावडे,भडगाव तहसीलदार सागर ढवळे (भडगाव), तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे, पंचायत समिती गटविकास अधिकारी अतुल पाटील, न. पा. प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील, रावसाहेब पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, पिंपळगाव हरे. पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक निता कायटे, पोलिस उपनिरीक्षक गणेश चौबे, मेडीकल आॅफीसर प्रिया देवरे (लोहटार), डॉ. सागर सय्यासे (नांद्रा), डॉ. प्रशांत बोरसे, विलास सनेर, स्वीय्य सहाय्यक राजेश पाटील उपस्थित होते.
पाचोरा व भडगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना संक्रमित रुग्णांची वाढ होत असल्याने प्रशासनाने गांभीर्य लक्षात दि. १२ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात आमदार किशोर पाटील यांचे अध्यक्षतेखाली तातळीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत येत्या पाच दिवसात शहरासह ग्रामिण भागातील लहान – मोठ्या व्यावसायिकांनी आपली कोराना टेस्ट करणे अनिवार्य आहे. व्यावसायिकांना टेस्ट केल्यानंतर आलेल्या रिपोर्टच्या आधारे त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार असुन दि. १८ मार्च पासुन ज्या व्यावसायिकांकडे कोरोना टेस्ट केल्याचे प्रमाणपत्र नसेल अशी दुकाने तात्काळ सिल करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शहरासह ग्रामिण भागात लग्न सोहळ्यात जास्तीत जास्त १०० वऱ्हाडी अपेक्षित असुन १०० पैक्षा जास्त वऱ्हाडी असल्यास त्यांचेवर देखील दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. एखाद्या घरातील व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पाॅझिटीव्ह आला असल्यास रुग्णास तात्काळ कोविड सेंटर मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात केल्यानंतर त्याचे कुटुंबियांना होम कोरोन्टांईन करण्यात येणार असुन त्यांचे शेजाऱ्यांना त्याबाबत सुचना देवुन संबंधित कुंटुबातील सदस्य जर घरा बाहेर पडत असेल तर शेजाऱ्यांनी तात्काळ प्रशासनास सुचित करावे. अशा प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांबाबत आमदार किशोर पाटील यांनी बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.