सामनेर येथील मिशन ५०० कोटी लिटर उपक्रमात कार्य करणाऱ्या गाव प्रमुख व शेतकऱ्यांचा चाळीसगाव येथे सन्मान
करण्यात आला
दिनांक १५/०२/२०२६ राजपुत मंगल कार्यालय चाळीसगाव येथे मिशन ५०० कोटी लिटर जलसाठा व पाच पाटील टीम आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा २०२६ व शेतकरी सन्मान सोहळा संपन्न झाला.
या सोहळ्यास माननीय श्री. अंशू गुप्ता, रेमंड मॅगसेसे पुरस्कार प्राप्त, संस्थापक – गुंज स्वयंसेवी संस्था, दिल्ली, मा श्री नितिन चंदनशिवे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विद्रोही कवी, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा डॉ उज्ज्वल कुमार चव्हाण, माजी अप्पर आयुक्त आयकर विभाग मुंबई यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी आपल्या वाणीतून प्रबोधनात्मक व प्रेरणादायी असे मार्गदर्शन उपस्थित गावकरी व शेतकऱ्यांना केले.
या सन्मान सोहळ्यात सामनेर गावात मिशन ५०० किती लिटर उपक्रमात योगदान दिल्याबद्दल गावप्रमुख म्हणून दादासो डॉ.अशोक पुंडलिक वाणी, दादासो अरुण साळुंखे व नितीन छगनराव पाटील यांचा तर शेतकरी प्रतिनिधी म्हणून देविदास मधुकर पाटील व स्वप्नील भानुदास वाणी यांचा प्रमुख मान्यवरांचे हस्ते सन्मान पात्र देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्याचे व सन्मानांचे सर्वत्र कोतुक होत आहे. जल हि जीवन हैं|
जल हैं तो कल हैं|

























