प्रकाश तेली यांच्या साहित्य, खाद्य सुरक्षा व मतदान जनजागृती कार्याचे भारतरत्न सी एन आर राव यांच्याकडून गौरव
जळगाव:- प्रकाश रामदास तेली यांनी विविध सामाजिक व राष्ट्रीय विषयांवर 5000 कविता व 6000 घोषवाक्य लिहिल्याबद्दल भारतरत्न सी एन आर राव यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.
प्रकाश तेली यांनी ज्या विभिन्न राष्ट्रीय विषयांवर कविता लिहून जी जनजागृती केली ते निश्चितच लाभदायी आहे प्रकाश तेली यांच्या कविता गरज व आवश्यकता याची जाणीव करुण देतात तसेच प्रत्येक काव्य संग्रह 50 कवितांनी समृद्ध आहे असे त्यांनी त्यांच्या शुभकामना संदेशात म्हटले आहे.