चोपडा महाविद्यालयात ‘साडी डे’ व ‘महिला तक्रार निवारण जाणीव जागृती कार्यशाळेचे’ आयोजन

चोपडा महाविद्यालयात ‘साडी डे’ व ‘महिला तक्रार निवारण जाणीव जागृती कार्यशाळेचे’ आयोजन

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालय आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत विद्यार्थिनीसाठी दि.२० फेब्रुवारी २०२४ रोजी ‘कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ (संरक्षण व प्रतिबंध मनाई निवारण अधिनियम २०१३) या कायद्याबाबत ‘एक दिवसीय जाणीव जागृती कार्यशाळेचे’ तसेच ‘साडी डे’ चे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.ए.सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी शिक्षणमंत्री कै.ना.अक्कासो.शरदचंद्रिका सुरेश पाटील व संस्थापक अध्यक्ष कै. दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रचिता पाटील हिने स्वागत गीत सादर केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन. सोनवणे हे उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर समन्वयक डॉ.एस.ए.वाघ, प्रमुख वक्त्या ऍड.सौ.किशोरी सागर नेवे, सागर श्रीकांत नेवे, महिला तक्रार निवारण समिती प्रमुख सौ.एम.टी.शिंदे, डॉ. सौ.क्रांती क्षीरसागर, सौ.आरती पाटील, चेतन बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला तक्रार निवारण समिती प्रमुख सौ.मायाताई शिंदे यांनी केले तर वक्त्यांचा परिचय सौ. आर. पी.जयस्वाल यांनी करून दिला.
या प्रसंगी ऍड. सौ.किशोरी सागर नेवे यांनी ‘कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ’ या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, ‘कामाच्या ठिकाणी अशी घटना घडल्या सर्वप्रथम तक्रार करण्यापासून सगळ्या बाबी कायदेशीर पद्धतीने समजावून घेतल्या पाहिजेत. स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी महिलांनी घराबाहेर पडलेच पाहिजे व कोण काय म्हणेल याची परवा न करता स्वाभिमानाने जगले पाहिजे ‘. याप्रसंगी त्यांनी अनेक उदाहरणे देखील दिली तसेच भारतीय दंड संहितेमध्ये महिलांच्या बाजूने कोणकोणते कायदे व तरतुदी आहेत ह्या साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितल्या. या कार्यशाळेनंतर उपस्थित महाविद्यालयातील युवतीने आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ.आर. पी. जयस्वाल व अश्विनी जोशी यांनी केले तर आभार श्रीमती विशाखा देसले यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू- भगिनी तसेच कल्पेश पाटील, विशाल पाटील व जीवन बागुल यांनी परिश्रम घेतले.याप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.