शिक्षण मिळवण्यासाठी मुलींनी पुढे येण्याची गरज — हाजी अबुलैस
*सध्याच्या काळात शिक्षण मिळवण्यासाठी मुलींनी पुढे येण्याचे गरज आहे.असे प्रतिपादन हाजी अबुलेस सेठ यांनी जिल्हा परिषद उर्दू शाळा जारगाव ता पाचोरा येथे आयोजित एका अर्थपूर्ण व सामाजिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण कार्यक्रम मध्ये केला. शाळेत दीर्घकाळापासून भेडसावत असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईच्या पार्श्वभूमीवर, या कार्यक्रमात शाळेसाठी त्यांनी बोअरवेल (बोरिंग) भेट स्वरूपात अर्पण केली.
ही बोरवेल पाचोरा शहरातील नामवंत, सामाजिक बांधिलकी जपणारे व दानशूर व्यक्तिमत्त्व, मा. हाजी अबुल्लैस सेठ साहेब यांच्या शुभहस्ते शाळेला प्रदान करण्यात आली. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
या संक्षिप्त पण प्रभावी कार्यक्रमास जारगाव परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, तसेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक श्री आसिफ जलील सर यांनी अत्यंत शिस्तबद्ध व प्रभावीपणे पार पाडले.
आभार प्रदर्शनाच्या भाषणात मा. जावेद रहीम सर यांनी प्रमुख पाहुणे मा. हाजी अबुल्लैस सेठ साहेब यांचा सविस्तर परिचय करून दिला. तसेच पाणी पाजण्याचे पुण्य, सदकार्याचे धार्मिक व सामाजिक महत्त्व यावर त्यांनी उपस्थितांसमोर अत्यंत प्रेरणादायी विचार मांडले.
या उपक्रमामुळे जि. प. उर्दू शाळा, जारगाव येथील पाण्याची समस्या दूर होण्यास मदत होणार असून, शिक्षणासोबतच सामाजिक सहकार्याचे उत्तम उदाहरण या कार्यक्रमातून समाजासमोर उभे राहिले आहे. कार्यक्रमाच्या नियोजनात तसेच यशस्वी आयोजनात शाळेचे मुख्याध्यापक आसिफ जलील शिक्षक सलमान शौकत, समीना शेख, मलिक हुमा, सना शेख, अकबर बिल्डर, सरपंच दानिश बागवान यांनी परिश्रम घेतले.

























