पाचोरा महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

पाचोरा महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

दि. 13 मार्च – पाचोरा शहरातील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ‘जागतिक महिला दिना’निमित्त दि. 09 मार्च 2023, गुरुवार रोजी विद्यार्थी विकास व मानसशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रा. डॉ. शिरीष पाटील यांनी भूषविले. अध्यक्षीय मनोगतात ते म्हणाले की, भारतीय समाजात महिला आदरणीय, वंदनीय आहेत. महिलांनी वर्तमान व भावी पिढीला संस्कारक्षम बनवण्यासाठी चिकित्सक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारावा यासाठी चार्वाक यांनी त्यांच्या पत्नीला कशा प्रकारे वैज्ञानिकदृष्टी प्राप्त करून दिली असे मत स्पष्ट केले. पाचोराचे मुख्य न्यायाधीश मा. श्रीमती एम. जी. हिवराळे, मा. श्रीमती ताईसाहेब जयश्री वर्मा-वाघ, उपप्राचार्य मा. प्रा. डॉ. वासुदेव वले, विद्यार्थी विकास अधिकारी व उपप्राचार्य मा. प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील, डॉ. प्राजक्ता शितोळे, प्रा. सुवर्णा पाटील हे विचार मंचावर उपस्थित होते.
यावेळी पाचोरा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मा. श्रीमती एम. जी. हिवराळे यांनी मार्गदर्शक करताना सांगितले की, रामायण, महाभारत यातील स्त्रिया तसेच मॉसाहेब जिजाऊ, सावित्रीबाई फुले, कवियत्री बहिणाबाई चौधरी यासारख्या महान स्त्रियांच्या कार्याचा वैज्ञानिक दृष्टीने दाखला देत, स्त्री शक्ती ही आदिशक्ती असून महिलांच्या हातात पुरुषांचे संपूर्ण घर, शारीरिक-मानसिक स्वास्थ्य, घरातील अधिकार, स्वयंपाक घर असते त्यामुळे खरंतर महिला या अबला नसून सबलाच आहेत असे मत व्यक्त केले. यापुढे त्यांनी असे प्रतिपादन केले की, महिलांनी फॅशनेबल पेहरावातून सौंदर्याची प्रतिमा उजळविण्यापेक्षा आपले विचार, वर्तन, नैतिकमूल्य सामाजिक जाणीव यातून सौजन्यशील, औदार्यशील व्यक्तिमत्व विकसित करावे. जेणेकरून वर्तमान व भावी पिढीची संस्कारक्षम निर्मिती हीच मुख्य राष्ट्रसंपत्ती ठरेल.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या मार्गदर्शक मा. ताईसाहेब जयश्री वर्मा-वाघ यांनी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी सकारात्मक विचारशैली, ध्यानधारणा यामधून शारीरिक-मानसिक स्वास्थ्य कसे जोपासयाचे याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी यजुर्वेद, चारवाक, आयुर्वेद यासारख्या वैदिक काळापासून ते आधुनिक काळात तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधारित ध्यानधारणा, सकारात्मक विचारशैली यांच्या व्हायब्रेशनचा शारीरिक-मानसिकतेवर होणारा परिणाम व महत्त्व विशद केले. स्त्रियांमध्ये होणारे हार्मोन बदल, गर्भ अवस्थेचा कालखंड तसेच गर्भावस्थेतील मानसिकता चांगली ठेवण्यासाठी कुटुंबाने आधार दिला पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना ग्राही पेशी किंवा पंच ज्ञानेन्द्रियाद्वारे ध्यानधारणेतून अवधानाचे केंद्रीकरण करून उत्तम अध्ययन सवयी कशा जोपासल्या पाहिजेत याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना अंतर्मन, अबोध अवस्था, बोधनिक विकास, क्षमता विकसित करून स्वतःचा व्यक्तिमत्व विकास कसा साधावा हे सदोहरण स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मानसशास्त्र विभागाच्या डॉ. प्राजक्ता शितोळे यांनी कार्यक्रमाचा उद्देश, हेतू व महिला दिनाचे महत्व स्पष्ट केले. तर प्रमुख अतिथींचा परिचय करून देताना प्रा. सुवर्णा पाटील यांनी प्रमुख वक्त्या मा. श्रीमती एम. जी. हिवराळे व मा. श्रीमती ताईसाहेब जयश्री वर्मा-वाघ यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला. याप्रसंगी प्रा. उर्मिला पाटील यांनी महिलांवर होणारे अत्याचार, हुंडाबळी याला अनुसरून ‘मुझे क्या बेचेगा रुपंया’ हे उस्फुर्त गीत गायले.
जागतिक महिला दिनानिमित्त मानसशास्त्र विभागाच्या वतीने दि. 08 मार्च 2023, बुधवार रोजी ‘महिला सक्षमीकरण – समान संधीची आवश्यकता’ या विषयावर वकृत्व स्पर्धा व ‘महिला सक्षमीकरण काळाची गरज’, ‘महिलांची समाजातील भूमिका’ या विषयांवर निबंध स्पर्धा आयोजित केली होती. त्याचे पारितोषिक वितरणही याप्रसंगी करण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेत कु. तनया लक्ष्मण जाधव (प्रथम), कु. भुवनेश्वरी दीपक भोईटे (द्वितीय), कु. डिंपल दीपक कुमावत (तृतीय) या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते अनुक्रमे 151,101, 51 रुपये व प्रमाणपत्र देण्यात आले. तर निबंध स्पर्धेत कु. दीपिका अरुण पाटील (प्रथम), कु. प्रियंका छोटू पाटील (द्वितीय), कु. योगेश्वरी राजेंद्र पाटील (तृतीय) व कु. सलोनी भगवान पाटील (उत्तेजनार्थ) या विद्यार्थिनींना 151, 101,51 रुपये व प्रमाणपत्र देण्यात आले. याप्रसंगी डॉ. के. एस इंगळे, डॉ. एस. बी. तडवी, प्रा. वाय. बी. पुरी, डॉ. माणिक पाटील, प्रा. स्वप्नील भोसले, प्रा. नितीन पाटील, प्रा. स्वप्नील पाटील, प्रा. अधिकराव पाटील, प्रा. अतुल पाटील, प्रा. शुभम राजपूत, प्रा. गौतम निकम, प्रा. विशाल पाटील, डॉ. क्रांती सोनवणे, प्रा. इंदिरा लोखंडे, डॉ. वैष्णवी महाजन प्रा. कृतिका गोसावी 120 विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. तनया लक्ष्मण जाधव तर आभार प्रदर्शन प्रा. उर्मिला पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्राजक्ता शितोळे व प्रा. सुवर्णा पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.