निकाला आधिच लंकेचे खासदारकीचे बोर्ड झळकताच विखेंनी मानले मतदारांचे आभार

निकाला आधिच लंकेचे खासदारकीचे बोर्ड झळकताच विखेंनी मानले मतदारांचे आभार!

(सुनिल नजन”चिफ ब्युरो”अहमदनगर जिल्हा) अंत्यंत चुरशीच्या झालेल्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. भाजपच्या महायुतीचे डॉ. सुजय विखे आणि महाविकास आघाडी कडून निलेश लंके हे एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून निवडणूक रिंगणात उतरले होते.तेरा तारखेला मतदान झाले निवडणूकीचा अधिक्रुत निकाल जाहीर होण्या अगोदरच महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या विजयाचा डंका वाजू लागला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एका ईब्लीस ग्रुपने निलेश लंकेच्या विजयाचे बोर्ड जिल्ह्यात झळकवले आहेत. इतका विजयाचा फुल्ल काँन्फिडंस लंकेंच्या कार्यकर्त्यांना आला आहे.या निवडणुकीत शरदचंद्रजी पवार साहेब यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या जुन्या नव्या सर्व कार्यकर्त्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्यामुळे सर्वच शिलेदार जोमाने घौडदौड करीत होते. तर काही ईडीच्या भितीने घाबरलेले नेते नुसते मौन बाळगून गप्प बसले होते. त्यांनी आतून मदत केली.त्यामुळे ही निवडणूक लंके विरुद्ध विखे अशी न होता विखे विरुद्ध पवार अशीच होती. सन १९९१ साली अपक्ष स्व.बाळासाहेब विखे विरुद्ध काँग्रेसचे यशवंतराव गडाख ही निवडणूक संपूर्ण देशभर गाजली होती. त्यावेळी आत्ताच नुकतेच दिवंगत झालेले टी.एन्.शेषन हे निवडणूक आयुक्त होते. तीच चिन्हे या वर्षीच्या निवडणूकीत दिसु लागली आहेत.संपूर्ण मतदारसंघात लंकेचा डंका वाजविन्यात पवार साहेब यशस्वी झाले आहेत. पण निवडणूक निकाल अजून बाकी असताना एसटीच्या पुढे पळणारे आणि अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले अती उत्साही कार्यकर्ते सरकारचे सर्व नियम धाब्यावर बसून बँनरबाजी करण्यात अग्रेसर असल्याचे दिसत आहेत. याचे परिणाम निवडणूक निकालानंतर काय होईल याची बहुतेक यांना जाणीव नसावी. महायुतीचे उमेदवार सुजयविखे पाटील यांनी या बँनरबाजी कडे दुर्लक्ष करीत अतिशय सावध पवित्रा घेत निवडणूक काळात आजी माजी आमदार, पदाधिकारी, नेते,कार्यकर्ते यांचे आभार मानले आहेत.आपण ठेवलेल्या विश्वासाची परतफेड अहिल्यानगरच्या सर्वांगीण विकासातून करेन असा विश्वास व्यक्त केला आहे.तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,दोन्ही उपमुख्यमंत्री,पालकमंत्री यांचेही आभार मानले आहे.जसजसा लंकेंचा डंका मतदार संघात वाजतोय तसतसे महायुतीच्या नेत्यांची झोप उडाली आहे. आपली विधानसभेची तिकिटे कापली जातात की काय म्हणून अनेकांची धाकधुक वाढली आहे. मतदार एकीकडे आणि नेते दुसरीकडे अशीच अवस्था संपूर्ण मतदार संघात पहावयास मिळाली. भाजपचा बालेकिल्ला म्हणून संबोधल्या गेलेल्या शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात मात्र शेवगावच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणूकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात सूरू आहे. तर पाथर्डी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार स्व. राजीव राजळे यांचा भाजपचे स्व.दिलिप गांधी यांच्या कडून झालेल्या पराभवाचा वचपा काढून पून्हा स्व.राजीव राजळेंना श्रद्धांजली अर्पण केली असल्याचे पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती यांनी मढी येथे पत्रकाराशी बोलताना सांगितले.एकंदरीत ही निवडणूक निलेश लंके यांच्या अस्तित्वाची आणि विखेपाटील यांच्या प्रतिष्ठेची बनली होती. स्व.बाळासाहेब विखे पाटील यांच्या काळातील अनेक जूने कार्यकर्ते विखे परीवाराने संपर्क न केल्यामुळे या निवडणुकीत अडगळीला पडल्याचे दिसून आले. नाराज झालेल्या काहींनी तर उघड उघड तुतारी वाजवून रणशिंग फूकल्याचे दिसून आले. विखे आणि लंके यांच्या कार्यकर्त्यांत विजयासाठी पैजाही लागल्या आहेत.