Home जळगाव एरंडोल तालुक्यातील तळई येथे वीज कोसल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू

एरंडोल तालुक्यातील तळई येथे वीज कोसल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू

एरंडोल तालुक्यातील तळई येथे वीज कोसल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू

दिनांक~०९/०६/२०२१
एरंडोल तालुक्यातील तळई येथील दोघांच्या अंगावर वीज कोसल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दि.९ जुन रोजी घडली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे तळई येथे आज (दि ९ जुन) रोजी दुपारी ३:३० वाजेच्या दरम्यान शेतातील एका झाडाखाली आठ शेतकरी पाऊस सुरु झाल्याने थांबले असता यातील भुषण अनिल पाटील (वय १८) व विक्रम दौलत माळी ( चौधरी ) (वय ६०) यांच्या अंगावर विज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच तीन जन जखमी झाले आहेत.यात रमेश कौतिक धनगर ( वय ६५), संदिप वामन वाघ (वय २८) व यांचा मुलगा निवृत्ती धनगर, शांताराम धनगर, सुरेश पाटील, विजय नाईक, बाळा धनगर जखमी आहेत. त्यांचेवर तळई येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले व त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

Don`t copy text!