⭕राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही; ⭕भा.ज.पा. आक्रामक…..!

⭕राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही;
⭕भा.ज.पा. आक्रामक…..

राज्यभर गाजत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन भा.ज.पा.ने आक्रमक भूमिका घेतली असून वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही असं भा.ज.पा.ने स्पष्ट केलं आहे.
राठोड यांचा राजीनामा नाही घेतला तर आम्ही अधिवेशन चालू देणार नाही, असं भा.ज.पा. मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी स्पष्ट केलं आहे.
 बीड जिल्ह्य़ातील परळी वैजनाथ येथील तरुणी पूजा चव्हाण हिने पुण्यात केलेल्या कथित आत्महत्येप्रकरणात राठोड यांचं नाव घेतलं जात असल्याने त्यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कारवाई करावी अशी मागणी भा.ज.पा.कडून केली जात आहे.
भातखळकर यांनी ए.बी.पी. माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना, एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणामध्ये नाव समोर घेतलं जाणाऱ्या मंत्र्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करुन एफ.आय.आर. दाखल करण्याची गरज होती.
मात्र राज्य सरकार आणि मुख्यमंत्री कसली वाट पाहतंय?,
असा प्रश्न उपस्थित केला.
तसेच भातखळकर यांनी राठोड प्रकरणावरुन ठाकरे सरकारव निशाणा साधताना, बलात्कारी आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्यांची पाठराखण करणारं हे सरकार असल्याचा टोलाही लगावला आहे.
पुण्यामध्ये आत्महत्या केलेली तरुणी आणि मंत्र्यांच्या ऑडिओ क्लिप फिरत आहेत.
तरी हे मंत्री उघड माझ्याने फिरतायत.
यावर राज्यात काहीच होत नाहीय हे खेदजनक असल्याचेही भातखळकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान राठोड प्रकरणामुळे सरकारची बदनामी होत असल्याने मुख्यमंत्री नाराज असल्याचे वृत्त सुत्रांच्या हवाल्याने देण्यात आळं आहे.
राठोड प्रकरणासंदर्भातील आरोपांमुळे सरकारची रोज नाचक्की होत आहे.
या प्रकरणावरुन विरोधकांकडून सतत टीका आहेत.