नोकरी पेक्षा व्यवसायाकडे वळा – आ. सुरेश भोळे 

नोकरी पेक्षा व्यवसायाकडे वळा – आ. सुरेश भोळे

 

 

जळगाव जिल्हा धनगर समाज महासंघ , मल्हारसेना , अहिल्या महिला संघ , कर्मचारी संघटना व सांस्कृतिक महासंघाच्यावतीने सर्व शाखीय धनगर समाजातील २१० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह , प्रशस्तिपत्रक व गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.

याप्रसंगी समाजाने केलेला सत्कार म्हणजे प्रोत्साहन असून हा अविस्मरणीय असतो. गुणवंत विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती सोबतच व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष द्यावे. मोबाईलच्या क्षणिक सुखाला बळी न पडता मोबाईलचा वापर हा गरजेपुरता झाला पाहिजे. संत महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांचे विचार आत्मसात करून युवकांनी उच्च शिक्षण घ्यावे व मोठे अधिकारी होऊन समाजाचा नावलौकिक करावा व समाजशील नागरिक बनावे असे प्रतिपादन सुरेश भोळे यांनी केले.

जळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक सभागृहात आयोजीत कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

 

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जळगाव शहराचे आ.राजुमामा भोळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दूध फाउंडेशनचे संचालक अरविंद देशमुख, मल्हारसेनेचे मा.सरसेनापती सुभाष सोनवणे,धनगर बोर्डिंगचे अध्यक्ष प्रभाकर न्हाळदे , रिदम एरीकेशन कंपनीचे संचालक कैलास धनगर,पी एस सोनवणे सर, धनगर समाज महासंघ मल्हार सेना चे माजी जिल्हाप्रमुख रमेश सोनवणे,धनगर समाज महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष करे ,माजी महापौर सदाशिव ढेकळे,शतायु हॉस्पिटलचे संचालक डॉ. गोपाल घोलप,मल्हारसेनेचे प्रदेश सरचिटणीस संदिप तेले ,रमेश सुलताने, वसंत भालेराव,अरुण ठाकरे,मंजुषा सूर्यवंशी,धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलिप धनगर , कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश बागुल,जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव चे संचालक समाधान धनगर,अविनाश भालेराव,दशरथ नाना लांडगे, विष्णूआप्पा ठाकरे,हरिभाऊ हिवराळे, रामचंद्र चऱ्हाटे, धर्मा सोनवणे, प्रमोद सोनवणे, मधुकर बाविस्कर,अनिल मनोरे, गणेश जाने, मधुकर फासे, ऍड. शरद न्हाळदे, ऍड.रिशीराव सोनवणे,रामभाऊ कचरे आदी मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते.

 

यावेळी आमदार राजूमामा भोळे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी भविष्यातही कष्ट, जिद्द व चिकाटी ठेऊन यश संपादन करा. समाज हितासाठी आपण काही देणं लागतो या भावनेने संस्कार जोपासत कार्य करावे असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष अरविंद देशमुख यांनी विद्यार्थ्यांनी सोशल मीडियापासून दूर राहून आपल्या शैक्षणिक गुणवत्तेकडे अधिक लक्ष द्यावे, लहान मुलांच्या पालकांनी विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर ठेवावे व जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन चांगल्या नोकरीस लागल्यास त्यांनी समाजाच्या ऋणातून उतरे होण्यासाठी समाज कार्यासाठी सदैव सहकार्य करावे असे आवाहन केले.

 

सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.गणेश बागुल यांनी आपल्या प्रास्ताविकातून समाजातील विद्यार्थ्यांनी गुणवत्तेची कास धरली पाहिजे व समाज संघटनासाठी एकत्र येणे गरजेचे असल्याचे विषद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे यांनी तर तुळशीराम सोनवणे यांनी आभार व्यक्त केले.

यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच समाजातील प्रतिष्ठित नागरिक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम प्रसंगी सुभाष सोनवणे, राहुल इथे, डॉ.गोपाल घोलप,सदाशिव ढेकळे,इयत्ता नववीचा विद्यार्थी रोहन अहिरे आदींनी आपली मनोगते केली.

 

या गुणवंतांचा झाला सत्कार !

 

यावेळी इयत्ता दहावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर तसेच डिप्लोमा, स्कॉलरशिप, नीट जेईई व व अन्य स्पर्धात्मक परीक्षा मधून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, दूध फेडरेशन संचालक अरविंद देशमुख व मान्यवरांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला.

दहावी व बारावी परीक्षेत प्रथम द्वितीय व तृतीय पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, संस्कार पुस्तक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह व गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी रिदम इरिगेशन सिस्टीम कंपनीचे संचालक कैलास धनगर यांनी स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र त्यांच्या कंपनीमार्फत देण्यात आले. कर्मयोगीनी प्रगती मंडळचे संस्थापक अध्यक्ष रमेश सुलताने सर व धनगर समाज प्राध्यापक महासंघाचे प्रदेश अध्यक्ष विजय शिरसाठ यांच्याकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावर लिखित पुस्तक सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आली.

 

*कार्यक्रम यशस्वीतेसाठी यांनी घेतले परिश्रम*

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभाष करे,संदिप तेले, कैलास धनगर, पी. एस. सोनवणे,रामचंद्र चर्‍हाटे,अरुण ठाकरे,धर्मा सोनवणे,गणेश बागुल,संतोष कचरे,तुळशीराम सोनवणे,महिंद्र सोनवणे,यशवंत शिरोळे,अनिल मनुरे,पांडुरंग पवार,प्रविण पवार,अशोक सपकाळ,मयुर ठाकरे,हर्षल पवार,धाराभाऊ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

समाज बांधवांनी, कार्यक्रमासाठी उत्स्फूर्तपणे उपस्थिती देऊन कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.