कोल्हापूरच्या पट्टणकोडोलीत विठ्ठल बिरदेव जन्मोत्सव सोहळा थाटात संपन्न

कोल्हापूरच्या पट्टणकोडोलीत विठ्ठल बिरदेव जन्मोत्सव सोहळा थाटात संपन्न

 

(थेट कोल्हापूरच्या नगरीतून) (सुनिल नजन”चिफ ब्युरो”अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील श्री क्षेत्र पट्टणकोडोली येथील मंदिरात बिरदेव जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दि.२० ते २७ मे या काळात अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व ह.भ.प.श्री गुरुवर्य महादेव महाराज मोठे देसाई, ह.भ.प.श्री नारायण खानू मोठेदेसाई महाराज (रिटायर्ड डी.वाय.एस.पी.),आनंदा महाराज कोळी, खानदेव महाराज नारूखान,कल्लपाण्णा महाराज बाळाई, शाम महाराज डावरे,डॉ बाबासाहेब पुजारी, अविनाश महाराज चौगुले, हुपरीचे धोंडीराम महाराज मुधाळे,यांची प्रवचणे झाली. तर सर्व ह.भ.प.अशोक महाराज शिंदे, तुकाराम महाराज हजारे, डॉ सुहास महाराज फडतारे, मारुती महाराज भोसले, पुंडलीक महाराज मन्नापुरकर, विजय महाराज नलवडे,तुकाराम महाराज धारवाडकर, यांची किर्तने झाली. सोमवार दि.२७ मे २०२४ रोजी ह.भ.प. सुभाष महाराज शिंगे यांचे काल्याचे किर्तन होउन श्रीकृष्णात बाबू जमदाडे तेली यांच्या (भंडारा)महाप्रसादाने या जन्मोत्सव सोहळ्याची सांगता झाली. या सप्ताहात दररोज काकड आरती, भजन,हरीजागर, पारंपरीक धनगरी ओव्या,ग्रंथ वाचन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, आणि अन्न दान,हे उपक्रम संपन्न झाले.या मंदिराच्या पुजाऱ्यापैकी तिन पुजारी नारायण विठू पुजारी,श्रीपती विठ्ठल पुजारी, धुळगोंडा बीरु पुजारी या तिन भक्तांनी धनगर समाजाचे पारंपरिक लोकगीत”सुंबरान मांडीले तवाच्याबा येळला”हे लोकगीत ऐकून त्यांच्या लक्षात आले की”वैशाख वद्य चतुर्थीच्या दिवशी सुर्योदय होता निर्जन वनाशी,बिरदेव जन्मले गंगासुरवंती पोटी”हे बोल ऐकून गुरुवार दि.१९/५/१९५५ या दिवशी श्री बिरदेव जन्मोत्सव सोहळ्याची सुरुवात झाली.सन१९५५ ते १९७९ पर्यंत या सोहळ्याचे स्वरूप म्हणजे सोहळ्याच्या आदल्या दिवशी व सोहळ्याच्या दिवशी बैलगाड्यांच्या धावण्याच्या शर्यती, घोड्यांच्या शर्यती, सायकल शर्यती, तरुणांच्या कुस्त्या व धावण्याच्या शर्यती, धनगरी ओव्यांच्या स्पर्धा, असे सर्व साधारण सोहळ्याचे स्वरूप होते. परंतु सन१९७९साली विठ्ठल बिरदेवांच्या पुजाऱ्या पैकी सेवानिव्रुत्त डी वाय एस पी हे पोलिस फौजदार असताना त्यांनी श्री बिरदेव जन्मोत्सवाचे औचित्य साधून ज्ञानेश्वरी व विठ्ठल बिरदेव महात्म्य ग्रंथाचे अखंड हरिनाम सप्ताहात रूपांतर केले. त्यामुळे अनेक भाविकात अनेक माळकरी तयार झाले.प्रत्येक एकादशीला विठ्ठल बिरदेव मंदिरात हरिपाठ व काकड आरतीची प्रथा सुरू केली.ती अव्याहतपणे गेली पंचेचाळीस वर्षे आजपर्यंत अखंडपणे सुरू आहे.(“विठ्ठल बिरदेव ग्रंथाविषयी माहिती”) – सुमारे शंभर वर्षापूर्वी

श्रीक्षेत्र पट्टणकोडोली

या गावी श्री नरहरी श्रीपाद जोशी यांचे ब्राह्मण वाड्यात श्रावण महिन्यात धार्मिक ग्रंथाचे पारायण होत असे. ते ब्राह्मण जोशी ग्रहस्थ विठ्ठल बिरदेवाचे निस्सीम भक्त होते. त्यांनी श्री बिरदेवाची आरती सुद्धा लिहली होती. परंतु त्यांना श्री विठ्ठल बिरदेव महात्म्या विषयी सविस्तर माहिती अवगत नव्हती. एका दिवशी रात्री एक वाजता कै.नरहरी श्रीपाद जोशी यांना विठ्ठल बिरदेवाने स्वप्नात द्रुष्टांत देउन प्रश्न विचारला की”नरहरी बुवा, तुम्हाला रामायण, महाभारत तोंडपाठ आहे. मग आमच्या महात्म्याचा ग्रंथ कधी लिहता? ते नरहरी बुवा झोपेतून जागे झाले. व त्यांचे समकालीन मित्र असलेले श्री धुळाप्पा ओमापुजारी यांचे घरी रात्रीच्या अंधारात कंदिलाच्या उजेडात गेले. व त्यांनी धुळाप्पा पुजाऱ्याना झोपेतून जागे करण्यासाठी दाराची कडी वाजवली. तो आवाज ऐकून धुळाप्पा पुजाऱ्यांनी दरवाजा उघडून नरहरी जोशींना आश्चर्याने प्रश्न विचारला की”हे नरबा अण्णा एवढ्या भल्या पहाटे माझ्या घरी येण्याचे कारण काय?”त्यावर नरहरी जोशींनी आपल्या स्वप्न द्रुष्टांताचा खुलासा केला. त्यांना मदत करण्यासाठी कै.धुळा ओमा पुजारी यांनी श्री विठ्ठल बिरदेव महात्म्य या विषयावर “सुंबरान मांडीले”या लोकगितांचा पारंपारीक ठेवा जिवंत ठेवलेल्या पुजाऱ्याने विठ्ठल बिरदेव महात्म्य या विषयावर ओव्यांचे गायन सुरु केले.परंतु ते ओवीगायक हे व्यवसायाने मेंढपाळ असल्याने वर्षातील चार महीने गावशिवारात मेंढपाळाचा

व्यवसाय करीत असत.परंतु आठ महिने परमुलुखाला म्हणजे विजापूर जिल्ह्यात मेंढ्या चारायला जात असत.अशाप्रकारे मेंढपाळ पुजाऱ्यांच्या ओवी गायनाच्या मदतीनेच श्री विठ्ठल बिरदेव महात्म्य लिखानाचे कार्य अखंडीतपणे बारा वर्षे सुरु होते.बाळू बीरू बाळाई, विठू अप्पा जायाना, हिवरा बाळू कामाना यांनी जोशींना मदत केली होती. कै.नरहरी जोशी यांच्या एका डोळ्यात टीक पडलेली होती. त्यामुळे त्यांची द्रुष्टी अधुरी झालेली होती. ते मेंढपाळ पुजाऱ्याची लोकगीते ऐकून त्याची प्राकृत मध्ये ओवी तयार करीत असत.व ती ओवी लिखानाच्या कामास सेवा निव्रुत्त सैनिक कै.दत्तात्रय शंकर जाधव या मराठा चारित्र्यवान व्यक्तींची त्यांनी मदत घेतली होती.अशाप्रकारे विठ्ठल बिरदेव महात्म्य या ग्रंथाचे हस्तलिखित तयार होउन तो अनमोल ठेवा कै.नारायण विठ्ठल ओमापुजारी यांच्या घरी धुळखात पडला होता. पुजारी धनगर समाज बहुसंख्य अशिक्षित असल्यामुळे त्या हस्तलिखित ग्रंथाचे टंकलिखित ग्रंथ तयार करण्याचे महत्त्व त्यांच्या घरी उरलेच नव्हते. तथापि त्या पुजाऱ्यापैकी एक असलेले नारायण खानू मोठे देसाई यांनी कै.दत्तात्रय शंकर यादव यांच्या उद्योगपती सुपुत्रांना विनंती केली की आपल्या वडीलांच्या हस्त अक्षरातील श्री विठ्ठल बिरदेव महात्म्य हा ग्रंथ प्रकाशित करावा. हे ऐकून जाधव बंधूंनी तात्काळ मांन्यता देउन विठ्ठल बिरदेव ग्रंथाच्या छपाईची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन सहकार्य केले. जाधव बंधूंच्या सहाय्याने विठ्ठल बिरदेव हा ग्रंथ गुरुवार दिनांक २२/९/८८ या विजया दशमीच्या दिवशी प्रसिद्ध करण्यात आला.या ग्रंथाची दुसरी आव्रुत्ती अहमदनगर येथील गणेश आर्ट यांनी गुरु प्रसाद काँप्युटर मध्ये २००४ साली पुनर्प्रकाशित केली आहे. असे पट्टण कोडोलीतील विठ्ठल बिरदेवाचे महत्त्व संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.