ब्रेकींग न्यूज:जळगावात तीन दिवसांचा जनता कर्फ्यू असणार- जिल्हाधिकारी अभिजित राऊत!

*ब्रेकींग न्यूज:जळगावात तीन दिवसांचा जनता कर्फ्यू असणार- जिल्हाधिकारी अभिजित राऊत!*

दि.९ मार्च २०२१ जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशांनुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शुक्रवार, शनिवार व रविवार अशा तीन दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असून यामुळे जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच सार्वजनीक कार्यक्रमांवर बंदी लादण्यात आली आहे. जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशानुसार जळगावात आता तीन दिवसांचा जनता कर्फ्यू असणार आहे.