चोपडा महाविद्यालयात केंद्रीय अर्थसंकल्प २०२२-२३ वर चर्चासत्र व वादविवाद सत्राचे आयोजन

चोपडा महाविद्यालयात केंद्रीय अर्थसंकल्प २०२२-२३ वर चर्चासत्र व वादविवाद सत्राचे आयोजन

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला,शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील वाणिज्य व अर्थशास्त्र विभागाच्या यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. २२ फेब्रुवारी २०२३ रोजी ‘केंद्रीय अर्थसंकल्प २०२२-२३’ यावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील उपस्थित होते.याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी तसेच उपप्राचार्य एन. एस. कोल्हे, व्यवस्थापन विभाग प्रमुख ए. एच. साळुंखे, एस. बी. पाटील आदि उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सी. आर. देवरे यांनी प्रास्तविक केले. यावेळी कार्यक्रमाचा उद्देश व विद्यार्थ्यांमध्ये बजेट विषयी जागरूकता निर्माण व्हावी हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. या चर्चासत्राप्रसंगी महाविद्यालयातील वाणिज्य व अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत सादरीकरण केले. या सत्रात एफ.वाय.बीकॉम, एस.वाय.बीकॉम, टी.वाय.बीकॉम या वर्गातील विद्यार्थ्यांचे वेगवेगळे गट करून प्रत्येक गटाला एक-एक विषय देण्यात आलेला होता. सदर विषयावर सर्व गटातील विद्यार्थ्यांनी तुलनात्मक विश्लेषण करून सकारात्मक व नकारात्मक बाजूने चर्चा घडवून आणली. या कार्यक्रमात जवळजवळ १० ग्रुपने आपले सादरीकरण केले. त्यामध्ये शैक्षणिक बाजू, शेती विषयक, कायदेविषयक, उद्योगधंदे, डायरेक्ट टॅक्स व इनडायरेक्ट टॅक्स, जीएसटी तसेच स्वयंरोजगार, बेरोजगारी त्याचप्रमाणे बजेटची विविध अंगे यावर विद्यार्थ्यांनी वैविध्यपूर्ण चर्चा घडवून आणली. या केंद्रीय अर्थसंकल्प सादरीकरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना एकूण ०५ पारितोषिके दिली जाणार आहेत. त्यामध्ये प्रथम बक्षीस रुपये ५०१/-, द्वितीय बक्षीस रुपये ४०१/-, तृतीय बक्षीस रूपये ३०१/-, चतुर्थ बक्षीस रुपये २०१/-, पंचम बक्षीस रुपये १०१/- असे बक्षीस विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत. या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाविषयी मनोगत व्यक्त करताना उपप्राचार्य एन.एस. कोल्हे म्हणाले की, अतिशय दर्जात्मक अशा प्रकारचा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी घडवून आणला. लोकसभेमध्ये व विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने चर्चा घडून येते व एकमेकावर ताशेरे ओढले जातात त्या पद्धतीपेक्षा कितीतरी वेगळी आणि चांगल्या स्वरूपाची चर्चा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी घडवून आणली असे त्यांनी मत व्यक्त केले.यातून विद्यार्थ्यांमध्ये वादविवाद कौशल्ये वाढीस लागेल. या कार्यक्रमाप्रसंगी परीक्षक म्हणून अर्थशास्त्र विभाग प्रमुख श्री. व्ही. पी.हौसे यांनी काम पाहिले.
यावेळी व्ही. पी. हौसे यांनी आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन बाविस्कर यांनी केले.
यावेळी डॉ.एन.सी.पाटील, सहा. प्रा. सौ.एच. ए.सूर्यवंशी, सहा. प्रा. सौ. पी.एस. जैन,सहा. प्रा. मिस. ए. सी.जोशी, सहा. प्रा. सौ. पूजा पुनासे, सहा.प्रा. मिस. आशा शिंदे इत्यादींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.