अभिनव विद्यालय येथे जिल्हाधिकारी मा.श्री अभिजीत राऊत यांनी विद्यार्थ्यांना दिले “समतेचे” बाळकडू

अभिनव विद्यालय येथे जिल्हाधिकारी मा.श्री अभिजीत राऊत यांनी विद्यार्थ्यांना दिले “समतेचे” बाळकडू..!

आज दि. 5 सप्टेंबर रोजी माहेश्वरी विद्या प्रसारक संचलित अभिनव विद्यालय येथे गणेशोउत्सवानिमित्त निमित्त इयत्ता नववी मधील आयाम खान पठाण या विद्यार्थ्याने गणेश स्थापनेसाठी स्वयं स्फूर्तीने पर्यावरण पूरक अशी सुंदर गणेश मूर्ती स्थापनेसाठी दिली तसेच शिक्षक दिनानिमित्त रेहान अली रजाक अली सय्यद यांच्या पालकांनी दगडी पाषाण असलेली” विठ्ठल रुक्मिणी” मूर्ती शाळेस भेट दिली .
यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत साहेब यांनी आयान खान पठाण व रेहान अली रजा अली सय्यद यांचे सत्कार व कौतुक करीत
सर्व जाती-धर्मांना बांधणारा
भारतियत्व हाच धागा आहे “भारतात अनेक जाती-धर्म आहेत. पण या सार्वांना एकत्र बांधणारा धागा हा भारतीयत्वाचा आहे. मुस्लिम विद्यार्थी आयान याने उत्सावासाठी गणेशाची मूर्ती देऊन समता, बंधुता , एकतेचा धागा बळकट केला आहे असे प्रतिपादन केले
यावेळी गणपतीची सद्भावला आरती श्री राऊत साहेब यांनी केली
यावेळी मुख्याध्यापक सौ. सरोज तिवारी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. उपशिक्षक
श्री संतोष सपकाळे यांनी सूत्रसंचालन केले यावेळी
संस्थेचे अध्यक्ष श्री श्याम भाऊ कोगटा उपाध्यक्ष
श्री संजय जी बिर्ला शालेय समिती चेअरमन श्री विनोद बियाणी,
श्री हेमंत पाटील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी रुंद उपस्थित होते.