कमल सृष्टी बहुउद्देशीय संस्था पाचोरा व महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग जळगाव तर्फे मध केंद्र योजनेअंतर्गत एकदिवसीय जनजागृती मेळावा संपन्न
दि. 6 ऑगस्ट शनिवार रोजी कमलसृष्टी बहुउद्देशीय संस्था पाचोरा व महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग यांच्या संयुक्त विद्यमानाने पिंपळगाव हरेश्वर हरिहरेश्वर मंदिर येथे मध केंद्र योजनेअंतर्गत एकदिवसीय जनजागृती मेळावा घेण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीस महात्मा गांधी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प माल्यार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व कार्यक्रमास सुरुवात झाली कार्यक्रमाला उपस्थित असलेले मान्यवर उद्घाटक व अध्यक्ष मा. श्री प्रकाश बाजीराव पाटील (सामाजिक कार्यकर्ते पिंपळगाव हरेश्वर) , प्रास्ताविक श्री राजेंद्र चव्हाण (जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी), यांनी केले तसेच कार्यक्रमाला प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून श्री व्ही. डी. पाटील (औद्योगिक पर्यवेक्षक खादी ग्रामोद्योग जळगाव), श्री रुपेश पाटील (औद्योगिक पर्यवेक्षक खादी ग्रामोद्योग जळगाव), श्री के. व्ही. सुरवाडे (मधु क्षेत्रिक खादी ग्रामोद्योग नाशिक), श्री एस. पी. विसपुते (गट संस्था पाचोरा), श्री आर. एन. जाधव (तालुका कृषी अधिकारी पाचोरा), यांचे मार्गदर्शन लाभले श्री के. व्ही. सुरवाडे यांनी मधमाशी पालन यावर खूप मोलाचे मार्गदर्शन केले मधमाशी ही निसर्गासाठी खूप मोलाचे काम करणारा जीव आहे मधमाशी पासून पर परागीकरण झाल्याने शेतकऱ्याच्या पिकांना जसे मोसंबी, डाळिंब, शेवगा, इत्यादी अशा पिकांमध्ये उत्पन्नात वाढ होते आणि या सृष्टीवर जोपर्यंत मधमाशी परपरागीकरण करत आहे तोपर्यंत ह्या निसर्गाचे सौंदर्य टिकून आहे मधमाशी या सृष्टी मधून नामशेष झाली तर हे सृष्टी नामशेष होईल त्यासाठी मधमाशी पालन केले पाहिजे म्हणजे दोन उद्देश साध्य होतील व्यवसाय पण मिळेल व निसर्गाला जपता पण येईल असे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन साहेबांनी केले व तालुका कृषी अधिकारी आर्यन जाधव साहेब यांनी शेतकऱ्यांनी शेती व त्याला जोड व्यवसाय म्हणून मधमाशी पालन करावे त्याने शेतकऱ्याच्या शेतीचे उत्पादनात पण वाढेल व त्याला शेतीला पूरक असणारा जोड व्यवसाय पण मिळेल जेणेकरून शेतकरी हा नुकसानात जाणार नाही त्यावर कर्ज होणार नाही त्यांनी शेतकऱ्यास सेंद्रिय शेती केली पाहिजे असेही मार्गदर्शन केले मधमाशी पालन व शेती विषयक योजना अंतर्गत त्यांना हे व्यवसाय करायचे असेल त्यांनी मला भेटा मी पूर्ण तुम्हाला मार्गदर्शन करेल असे कृषी अधिकारी जाधव साहेब यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या मार्गदर्शनातून सांगितले तसेच प्रकाश पाटील (सामाजिक कार्यकर्ते) यांनी अध्यक्ष मार्गदर्शन केले श्री मुकेश तुपे (कमलसृष्टी बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष) प्रशांत पाटील, सामाजिक कार्यकर्ते ईश्वर पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुनील चिंचोले (कमलसृष्टी बहुउद्देशीय संस्था सचिव )यांनी नव व्यवसायिकांना व्यवसाय विषयी मार्गदर्शन केले कार्यक्रमाला उपस्थिती गणेश पाटील, महेश पाटील, रवींद्र शर्मा, पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते व मेळाव्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाचे आभार श्री महेश पाटील यांनी मानले