28 व 29 मार्च रोजी महाराष्ट्रातील सर्व वीज कर्मचारी,अभियंते,अधिकारी यांच्या संघटना आणि कंत्राटी कामगारांचा संप अटळ

28 व 29 मार्च रोजी महाराष्ट्रातील सर्व वीज कर्मचारी,अभियंते,अधिकारी यांच्या संघटना आणि कंत्राटी कामगारांचा संप अटळ

————————————————-
*ऊर्जा सचिव व तिन्ही कंपन्यांचे व्यवस्थापन यांच्या बरोबरच्या वाटाघाटीत सामंजस्य करार न झाल्याने सर्व संघटनांचा २८-२९ मार्चच्या दोन दिवस संपावर जाण्याचा ठाम निर्णय*

*” खाजगीकरणाद्वारे राज्य आणि देश बरबाद करण्याचा निर्णयाविरुद्ध आमची लढाई आहे.”*
दिनांक २५ मार्च रोजी महाराष्ट्र शासनाचे उर्जासचिव यांच्या पातळीवर व तिन्ही कंपन्याचे व्यवस्थापकिय संचालकांचे उपस्थितीत वीज उद्योगांतील संघर्ष समिती व कंत्राटी संघटना कृती समितीच्या ३९ पदाधिकाऱ्यांची
ऑनलाईन चर्चा झाली.
*सर्व संघटनांनी ९ फेब्रुवारी २२ रोजी दिलेल्या संपाच्या नोटीसवर दिड़ महिन्यापर्यंत कोणतही चर्चा न करता ऐन संपाच्या तोंडावर व्यक्तीशः बैठक न घेता ही ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती.* याबाबत शासन व व्यवस्थापणाने संप आंदोलनाच्या गंभीरपणाकडे केलेल्या दुर्लक्षा बदल सभेत तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
मागण्या….
1) देशांतील संपूर्ण वीज उद्योगाचे खाजगीकरण करण्याच्या दृष्ट हेतूने केन्द्र शासनाने एकतर्फी निर्णयाने आणलेले विद्युत (संशोधन) बील २०२१ मागे घ्यावे.
2) महाराष्ट्राच्या ६ जलविद्युत केन्द्राचे खाजगीकरण रद्द करावे.
3) स्वतंत्र कृषी कंपनी निर्माण करण्याचा निर्णय मागे घ्यावा.
4) तिनही कंपनीमध्ये तयार करण्यात आलेले एकतर्फी बदली धोरण रद्द करावे.
5) ३० हजार कंत्राटी कामगारांना वयाच्या ६० वर्षापर्यंत नोकरीचे सरंक्षण द्यावे.
6) 40 टक्के पेक्षा जास्त रिक्त असलेल्या जागांवर कर्मचारी सरळ सेवा भरती करावी.
7) महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचा आणि राजकीय वाढता हस्तक्षेप बंद करावा.
इत्यादी अत्यंत महत्वपुर्ण व धोरणात्मक प्रश्नावर संप ऐन तोंडावर येऊन ठेपलेला असतांना ऑनलाईन बैठकीतून कांही साध्य होणार नाही याची कल्पना असूनही वाटाघाटीस नकार नको म्हणून संघटनांनी भागीदारी केली.
वीज कामगारांचा होणारा संप हा केंद्र व राज्य सरकारच्या वीज उद्योगांचे खासगीकरण करण्याच्या प्रस्तावित धोरणांच्या विरोधात असल्यामुळे वीज ग्राहक व सामान्य जनता यांनी या संपात सहकार्य करावे असे नम्र आवाहन कर्मचारी संघटनाच्या वतीने करण्यात येत आहे.
संपाच्या नोटीसमधील सातही प्रश्नावर उर्जा सचिवांनी संघटनांनी मांडलेली बाजू ऐकून घेतल्यानंतर त्याबाबत मंत्री महोदयांना कळवून त्यावर विचार करू व आपल्याला कळवण्यांत येईल या वाक्यांनी बैठकीची सांगता केली. या वाटाघाटीत कोणताही प्रश्न न सुटल्याने व करार न झाल्याने सर्व संघटना प्रतिनिधींनी चर्चा करून दि.२८ व २९ मार्चला दोन दिवसाच्या संपावर जाण्याचा निर्णय घोषीत केला असून शासन व व्यवस्थापणाला त्याची माहिती देण्यात आली आहे.
*केन्द्र सरकारच्या उर्जामंत्रालयाने उर्जा क्षेत्रांतील सर्व घटकांशी विचार विमर्श न करता एकतर्फी निर्णयाने विद्युत (संशोधन) बील २०२१ पार्लमेंटमधे पास करून घेण्यास प्रस्तावित केलेला आहे.त्याला देशांतील वीज उद्योगांतील सर्व कर्मचारी व इंजिनिअसंच्या संघटनांनी विरोध केला असून दोन दिवसाच्या देशव्यापी संपावर जाण्याचे ठरवले आहे.*
*वीज कंपन्यांमध्ये कार्यरत 27 संघटना आणि कंत्राटी कामगाराच्या सर्व संघटना यांच्यावतीने दि.२८ च्या शुन्य तासापासून दोन दिवसाचा संप सुरू होईल संप काळात कामाच्या ठिकाणी सर्व कर्मचारी, अभियंते, अधिकारी व कंत्राटी कामगार निदर्शने करतील.*
हा संप सर्वांनी शांतपणे व शिस्तीने करावा अश्या सुचना संघर्ष समिती व कृती समितीने सभासदांना दिल्या आहेत. उर्जा उद्योगाच्या व कंपन्यांच्या अस्तित्वा करीता हा संप असल्यामुळे संप काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची सर्व संपकरी संघटनांनी ताकीद दिली आहे.
जळगाव परिमंडळ कार्यालय समोर दि.२८आणि २९ मार्च २०२२ रोजी ठिय्या आंदोलन सुरू केले असून दोन दिवस संपात सहभागी असून संपूर्ण महाराष्ट्रात ९० टक्के कर्मचारी अधिकारी अभियंते संपात सहभागी झाले आहेत असा दावा केला आहे.

आपले नम्र…
.कॉ.विरेंद्रसिंग पाटील,पराग चौधरी,आर आर सावकारे,विजय सोनवणे,एस के लोखंडे,सादिक शेख
*महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी,अधिकारी,अभियंता संघर्ष समिती व महाराष्ट्र राज्य वीज कामगार कंत्राटी संघटना कृती समिती*