स्वतःला हिंदू म्हणून घेणारे सरकार असताना आमचं श्रद्धा स्थान असलेल्या संत महंताना जर अवैध धंद्या विरोधात रस्त्यावर उतरावे लागत असेल तर त्या सरकारचा मी जाहीर निषेध करतो : माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा सरकार वर हल्लाबोल!नंतर कामत शिंगवे येथे गुप्त बैठक संपन्न
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) स्वतःला हिंदू म्हणून घेणार सरकार सत्तेवर असताना अवैध धंद्या विरोधात संत महंताना जर रस्त्यावर उतरावे लागत असेल तर त्या सरकारचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो.असे वक्तव्य महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातील माजी उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सरकार वर हल्लाबोल केला. ते अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी त्यांच्या समवेत राहुरी नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, नगरसेवक प्रशांत डौले,नंदकुमार तनपुरे,संजय लवांडे पाटील, सुनिल पाटील लवांडे,नितीन पाटील लवांडे, प्रसाद देशमुख, बाळासाहेब लवांडे,सुनिल पुंड
हे आवर्जून उपस्थित होते. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तिसगावातील अवैध धंदे, कत्तलखाने,चक्री, दारू,गांजा, मटका या विषयावर पोलिस खात्याच्या अब्रुचे चांगलेच धिंडवडे काढत वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर आरोप ही केले.तिसगाव येथील अवैध धंद्यामुळे अनेक गोर गरीबांचे संसार उघड्यावर पडून उध्वस्त झाले आहेत.थेट अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना तिसगाव मध्ये येऊन कारवाई करावी लागते मग तिसगाव येथील पोलिस काय गोट्या खेळतात का ? असा सवाल उपस्थित करून तिसगाव विभागात कार्यरत असलेल्या पोलीसांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली आहे.तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री हे आमचं श्रद्धा स्थान आहे.आणि या अवैध धंद्या विरोधात त्यांना रस्त्यावर उतरावे लागत असेल ही प्रशासनाच्या दृष्टीने अतिशय लांच्छनास्पद बाब आहे.सरकारने गोवंश हत्या बंदीचा कायदा केला तो सरकार चा निर्णय आहे. गोवंशहत्या बंदी कायद्याच उल्लंघन झाले त्यामुळे हींदूच्या भावना दुखावल्या गेल्या हे जरी खरे असले तरी गोवंश बंदीचा जास्त फटका हा गोर गरीब शेतकऱ्यांनाच बसला आहे.आजच्या काळात शेतकऱ्यांना भाकड जनावरे सांभाळणे हे अत्यंत कठीण होत आहे.त्यासाठी सरकारने सरकारी गोशाळा काढायला पाहिजे. शेतकऱ्यांना भाकड जनावरे सांभाळण्या साठी सरकारी अनुदान दिले पाहिजे अशी मागणी तनपुरे यांनी केली.आज शेतकरी वर्ग अतिशय अडचणीत आला आहे.सरकारला हींदूची मत लागतात पण हींदूच्याच राज्यात साधुसंतांचा घोर अपमान केला जातो ही सरकारच्या दृष्टीने अत्यंत निषेधार्थ बाब आहे.अशा वेगवेगळ्या विषयांवर प्राजक्त तनपुरे यांनी सरकारचा निषेध व्यक्त करीत भरलेल्या पत्रकार परिषदेत सरकार वर जोरदार टीकास्त्र सोडले.या पत्रकार परिषदे नंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तनपुरे यांची तालुक्यातील कामत शिंगवे येथे उद्धव दुसंग यांच्या निवासस्थानी ३९ गावातील अत्यंत महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची अत्यंत महत्त्वाची गोपनीय बैठक पार पडली. त्या बैठकीत आगामी विधानसभा पोट निवडणुकी संदर्भात नेमका काय निर्णय घेतला पाहिजे या संदर्भात उपस्थित कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. आपण सत्तेच्या बाजुने गेले पाहिजे की नाही गेले पाहिजे यावर अनेक कार्यकर्त्यांनी आपली मत मतांतरे व्यक्त केली.काही निवडक प्रमुख गावातील कार्यकर्ते त्यांनी “तनपुरे ” हाच आमचा पक्ष आहे.तुमच्या कडून जो निर्णय घेतला जाईल तो आम्हाला मान्य आहे असे निक्षून सांगितले.

























