“पंकजा”-“मोनिका” दोघी बहिणी ग आता विकासच हाय,माशान मारलाय दणका ग “रोपवे” मढीला जाय, आमदार राजळेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

“पंकजा”-“मोनिका” दोघी बहिणी ग आता विकासच हाय,माशान मारलाय दणका ग “रोपवे” मढीला जाय, आमदार राजळेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) पौराणिक कथांमध्ये असा उल्लेख आढळतो की माशापासुन मच्छिंद्रनाथांचा जन्म झाला आहे तर हत्तींच्या कानातुन कानिफनाथ यांचा जन्म झाला आहे. चैतन्य कानिफनाथ हे मढीतील गडावर आहेत तर मच्छिंद्रनाथ हे सावरगावातील मायंबा गडावर आहेत. या दोन्ही गडावर जाण्यासाठी जे डांबरी रस्ते आहेत ते अतिशय तुटपुंजे आहेत. या ठिकाणी भाविकांची अमावस्या, पौर्णिमा, गुरुवार, शनिवार या दिवशी सतत मोठी गर्दी होत असते म्हणून हा रस्ता रुंद व्हावा आणि मायंबा गड ते मढीतील कानिफनाथ गड या दोन्ही गडांना जोडण्यासाठी तिन किलोमीटरची हवाई “रोपवे” लाईन सुरू करावी म्हणून शेवगाव -पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या हॅट्ट्रिक आणि लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कडे लेखी मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील खुंटेफळ येथील सिंचन प्रकल्प आणि सावरगाव येथील मच्छिंद्रनाथाच्या मुख्य समाधि मंदिराच्या सुमारे पाच कोटी खर्चाच्या नुतनीकरण कामाचा प्रारंभ आणि गडाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यासाठी आष्टी तालुक्यात आले होते.त्यावेळी आमदार मोनिकाताई राजळे यांनी ही मागणी केली.या मागणीला पाठिंबा देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की केंद्रीय रस्ते विकास आणि बांधकाम मंत्री नामदार नितिनजी गडकरी साहेब यांच्या अखत्यारीत हा प्रश्न असुन त्यांच्या कडे जाऊन आपण मागणी करू ते निश्चितच मंजुरी देतील असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मढीच्या कानिफनाथ देवस्थानचे ट्रस्टचे विश्वस्त भाऊसाहेब मरकड, नवनाथ मरकड,व रविंद्र आरोळे आणि आमदार राजळे यांनी देवस्थानच्या वतीने आणि मतदार संघाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा सन्मान केला.यावेळी महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री आणि अहिल्यानगरचे पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, नामदार पंकजाताई मुंडे, आष्टीचे आमदार सुरेश धस, साहेबराव दरेकर, हे आवर्जून उपस्थित होते. नामदार पंकजाताई मुंडे यांनी भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस हे मिडिया समोर मुंडे परीवारा विरोधात सतत सिनेमातील हिरो प्रमाणे डायलॉग बाजी करून बदनामी करतात याची दखल घेत पंकजाताई मुंडे यांनी सडेतोड उत्तर देत मुख्यमंत्र्यासमोरच सांगितले की “सुरेश अण्णा धस,जसे तुम्ही मिडिया समोर चित्रपटाचे डायलॉग म्हणता ना तसे आज मी देखील म्हणते की मेरा वचन हे मेरा शासन है, मी नामदार गोपिनाथ मुंडे ची लेक आहे,बोलने एक आणि करणे एक हे माझ्या रक्तात नाही.सुरेश धस मी तुम्हाला अण्णा म्हणते पण तुम्ही मला ताई म्हणत नाहीत,आपलं प्रेमाच नातं आहे म्हणून आम्ही तुम्हाला इज्जत देतो.तुम्ही तुमच्या मोठ्या मुलाच्या लग्नात साडी आणि पत्रिका घेऊन मला निमंत्रण दिले होते तेव्हा मी आले होते.आता लहान मुलांच्या लग्नातही मला बोलावलं तर मी नक्कीच येईल. हा कार्यक्रम शासनाचा आहे.शासन देवेंद्र फडणवीस साहेब आहेत.त्यात मी मंत्री आहे आणि राधाकृष्ण विखे पाटील हे जलसंधारण मंत्री आहेत त्या मुळे मी आले.कार्यक्रम पत्रिकेत नाव नसतं टाकलं आणि मला बसायला जागा नसती मिळाली तरी मी आलेच असते कारण मी मुख्यमंत्र्याची लाडकी बहिण आहे “असा खणखणीत इशारा देत आमदार सुरेश धस यांचा ना.पंकजाताई मुंडे यांनी चांगलाच खरपूस समाचार घेतला.कारण सुरेश धस यांनी आमदारकीच्या निवडणुकीत पंकजाताई मुंडे यांनी मला पाडण्यासाठी प्रयत्न केले असा मिडिया समोर जाऊन जाहीर आरोप केला होता त्याला नामदार पंकजाताई मुंडे यांनी सडेतोड उत्तर दिले आणि आमदार सुरेश धस यांची बोलती बंद केली. सुरेश धस यांनी पंकजाताई मुंडे यांचा सत्कार करताना केलेली क्रुती आलेल्या मतदारांच्या तीक्ष्ण नजरेतून सुटली नाही.एकाच पक्षात राहून एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले आमदार सुरेश धस आणि पंकजाताई मुंडे या कार्यक्रम स्थळावर एकाच गाडीतून आणि एकाच मंचावर शेजारी शेजारी बसलेले पाहून दोघांच्याही उपस्थित समर्थक कार्यकर्त्यां मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता म्हणून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या निमित्ताने ना.मुंडे व आ.राजळे यांच्या विषयी काही ओळी सुचल्या त्या अशा की ” पंकजा – मोनिका दोन्ही बहिणी ग आता विकासच हाय,मायंबानी मारलाय दणका ग “रोपवे” मढीच्या तळाला जाय”.