मी शरण तुला जय “न्यायदेवते माॅ ” म्हणत वाल्मिक कराड यांचे पुणे सीआयडी कडे समर्पन,तर केज तालुका न्यायालयाकडून १४ दिवसाची पोलीस कोठडी
(सुनिल नजन चिफब्युरो/स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्सा जोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे गूढ उकलन्याचे काम सी आय डी पथकाकडे दिले होते. संशयित आरोपी म्हणून वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे यांची नावे चर्चेत होती.परंतू केज तालुक्यातील पवन ऊर्जा क्षेत्रातील अवादा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे दोन कोटी रुपये खंडणी मागितली म्हणून वरिल तिघांच्या विरोधात केज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ६३८/२०२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.तेव्हापासुन वाल्मिक कराड हा फरार होता. तो मध्य प्रदेश, उज्जैन,महाकालेंश्वर, अक्कलकोट येथील देवदर्शन झाल्यावर स्वतः हुन पुण्यात आला.परंतू ३१डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी कराड हा ” मी शरण तुला जय न्यायदेवते माॅ “म्हणत पुण्यातील पाषाण येथील सी आय डी अधिकारी सारंग आव्हाड यांच्या पथकासमोर स्वतः हुन शरणागती पत्करून हजर झाला. पुणे सीआयडी पथकाने तातडीने कराड यांची रवानगी थेट बीड जिल्ह्यातील सी आय डी चे डि वाय एस पी अनिल गुजर यांच्या पथकाकडे केली. सी आय डी पथकाने कराड याला ताबडतोब रात्री उशिरापर्यंत केज येथील न्यायालयात हजर केले.केज न्यायालयाचे न्यायमूर्ती बाविस्कर साहेब यांनी कराड याच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून त्याला १४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.त्यानंतर कराड याला बीड शहर पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले होते.बीड जिल्ह्यातील नवीन जिल्हा पोलिस अधीक्षक नवनित काॅवत यांनी तातडीने बीडचे जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्ह्यातील सर्व शस्त्र परवान्याची तपासणी करण्याची मागणी केली आहे. कारण मस्सा जोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले होते. कराड हा सि आय डी च्या पथकाकडे सरेंडर होण्यापूर्वी आपण निर्दोष आहोत सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशा आशयाचा हॉटसाप वर व्हिडिओ व्हायरल करत सी आय डी पथकाकडे सरेंडर करीत हजर झाला व पोलीसांसमोर शरणागती पत्करून स्वसमर्पण केले. कराड याला खंडणीच्या गुन्ह्यात हजर करण्यात आले आहे. मग संतोष देशमुख यांच्या हत्येचे खरे मारेकरी कोण हा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणी बोलताना सांगितले की वाल्मिक कराड हा नेमका कोठे होता हे पोलिस खात्याला अजिबात माहीत नव्हते याच आश्चर्य वाटतं.वाल्मिक कराड प्रकरणात मुख्यमंत्र्यावर दबाव आणला गेला आहे पण मुख्यमंत्र्यांनी त्या दबावाला बळी पडू नये असे प्रकाशजी आंबेडकरांनी म्हटलं आहे. पुण्यातील कोरेगाव भीमा येथील शौर्य दिनाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात आंबेडकर हे बोलतं होते. आंबेडकरांच्या या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की कोणालाही सोडणार नाही राज्यात कोण काय म्हणाले ते तितकेसे महत्वाचे नाही.जिथे पुरावे आहेत तिथं आम्ही कोणालाही सोडणार नाहीत.आम्ही पुरावे गोळा करीत आहोत.आणखी कोणाकडे काही पुरावे असतील तर ते ही द्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत असलेल्यांना शिक्षा झालीच पाहिजे हे महत्त्वाचे आहे.अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिली.सरपंच देशमुख यांच्या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.थेट हिवाळी अधिवेशनात याचे पडसाद उमटले होते.साऱ्या देशाचं लक्ष या प्रकरणाच्या तपासाकडे लागले आहे.