आमदार सुरेश धस यांनी आष्टी तालुक्यातील मयत बुट्टा उर्फ संजय गायकवाड यांच्या हत्येचा आवाज विधानसभेत उठवावा : लटपटे

आमदार सुरेश धस यांनी आष्टी तालुक्यातील मयत बुट्टा उर्फ संजय गायकवाड यांच्या हत्येचा आवाज विधानसभेत उठवावा : लटपटे

 

(सुनिल नजन चिफब्युरो/स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्सा जोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आवाज थेट विधानसभेत उठवून देशमुख कुटुंबीयाला न्याय मिळवून देण्यासाठी आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी जो प्रयत्न केला त्या बद्दल आमदार महोदयांचे हार्दिक अभिनंदन.परंतू आता आष्टी तालुक्यातील मयत बुट्टा उर्फ संजय गायकवाड या आदिवासी जमातीतील युवकांचीही हत्या करण्यात आलेली होती त्याच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी म्हणून आमदार सुरेश धस यांनी तातडीने विधानसभेत आवाज उठवावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आष्टी तालुक्यातील नेते भाऊसाहेब लटपटे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना केली आहे.भाउसाहेब लटपटे यांनी असा आरोप केला आहे की त्यावेळी पोलिसांनी आमदार सुरेश धस यांच्या जमिनीतून शस्त्र जप्त केली होती. मयत बुट्टा उर्फ संजय गायकवाड यांच्या पत्नीनी आष्टी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती त्या मध्ये आरोपींची नावे पोलिसांनाही स्पष्ट शब्दात सांगितली होती परंतु तक्रारदार महिलेलाच दमदाटी करून त्या वेळेस पोलिसांनी कारवाई करण्यात कुचराई करीत ते प्रकरण पुर्णपणे दडपले आहे आदिवासी कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी आहे.संजय गायकवाड हा ही आदिवासी जमातीतील युवक होता.सन २०१४ साली त्याचीही हत्या करण्यात आलेली आहे. आमदार सुरेश धस यांनी सुद्धा गुंडांची गॅंग तयार केलेली आहे आणि ते सुद्धा गुंडांना सांभाळत आहेत.भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे 30/12/2022 रोजी दुःखद निधन झाले सारा देश शोकसागरात बुडालेला असताना आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी प्रसिद्ध नर्तिका गौतमी पाटील यांना आष्टीत आणून नाचविले ही तुमची देशसेवेचीनिष्ठा आणि मानवता आहे का ? सदर कार्यक्रम पुढे ढकलता आला असता पण तुम्हाला फक्त आपला बडेजाव मिरवायची हौस होती.असाही सवाल ही भाऊसाहेब लटपटे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना व्यक्त केला आहे. इतर नेत्यांनी अभिनेत्रींचे कार्यक्रम आयोजित केले तर ते तुम्हाला खटकते आणि तुम्ही देशाच्या प्रधान मंत्र्याच्या मातोश्रीच्या निधनानंतर शोकसभा घेण्यात ऐवजी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात हे बरोबर आहे का?आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचं पहायचं वाकून ही प्रवृत्ती आमदार महोदयांनी बदलली पाहिजे असे लटपटे यांनी सांगितले. बीड जिल्ह्यातील इतर आमदारांनी मयत संजय गायकवाड या आदिवासी कुटुंबांला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.त्याच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे.गायकवाड यांच्या हत्येच्या वेळी नेमका कोण “आका” होता आणि त्याच्या इशाऱ्यावरून मयताची हत्या करण्यात आली त्याला ही जनते समोर आणून कडक सजा दिली पाहिजे.बीड जिल्ह्यातील नवीन बदलून आलेले जिल्हा पोलिस अधीक्षक नवनित काॅवत साहेब यांनी तातडीने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून मयत बुट्टा उर्फ संजय गायकवाड यांच्या पत्नीनी आष्टी तालुक्यातील पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीची चौकशी करून मयत गायकवाड यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आता पुन्हा नव्याने मयत गायकवाड यांच्या हत्येचा तपास सुरू करून आदिवासी गायकवाड कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आष्टी तालुक्यातील नेते भाऊसाहेब लटपटे यांनी केली आहे. ते आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन थेट बीड जिल्हा पोलिस अधीक्षक नवनित काॅवत यांची भेट घेऊन मयत गायकवाड यांच्या हत्येची फाईल पून्हा नव्याने ओपन करून या हत्येचा गूढ तपास उकलन्यासाठी आणि मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना विनंती करून आदिवासी जमातीतील गायकवाड कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे लटपटे यांनी सांगितले आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनीही या प्रकरणात लक्ष घालून मयत बुट्टा उर्फ संजय गायकवाड यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी नव्याने जोर धरु लागली आहे.