ईव्हीएम नको,घोटाळा झालाय मग ,सह्याच्या मोहीमेत सहभागी व्हाः पुण्यातील वंचितच्या बैठकीत प्रकाश आंबेडकर गरजले?
(सुनिल नजन”चिफ ब्युरो”अहिल्यानगर)
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या आहेत. 288 विधानसभा मतदारसंघा पैकी एकाही मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला साधे खातेही खोलता आले नाही.ही बाब राज्यातील वंचित आघाडीच्या नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे.वंचित बहुजन आघाडीकडून राज्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत श्रद्धेय प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षते खाली राज्यातील प्रमुख मतदार संघातील कार्यकर्त्यांची रविवारी एक चिंतन बैठक पुण्यात आयोजित करण्यात आली होती.त्या बैठकीत अनेक उमेदवारांकडून ईव्हीएम घोटाळा झालाय अशी तक्रार दाखल करण्यात आली. मग प्रकाश आंबेडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात वंचित आघाडीच्या वतीने ईव्हीएम नको म्हणुन सह्याची मोहीम राबवली जाणार आहे.या मोहीमेत सर्वांनीच सहभागी होऊन आवाज उठवावा असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील जनतेला केले आहे. त्याचवेळी अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार प्रतापराव ढाकणे यांनीही रविवारी पाथर्डी तहसील कार्यालयासमोर ईव्हीएम ची प्रतीक्रुती जाळून प्रथम या ईव्हीएमच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे.त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार,राहुरीचे माजी मंञी प्राजक्त तनपुरे, पारनेरच्या उमेदवार राणीताई लंके ,अभिषेक कळमकर यांच्यासह मतदारसंघातील अनेक गावातील कार्यकर्त्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.नंतर बाजार तळावर मोठा मेळावा घेण्यात आला.मेळाव्या द्वारे पाथर्डीत पेटलेला वणवा संपूर्ण महाराष्ट्रात वंचित आघाडीकडून पेटवला जाणार असल्याची चिन्हे निर्माण झाल्याचे दिसत आहेत. पुण्यातील बैठकीत अहमदनगर जिल्ह्यातून वंचितचे राज्यप्रवक्ते किसनराव चव्हाण सर हे आवर्जून उपस्थित होते. ईव्हीएम हटाव ही सह्याची मोहीम राज्यभर राबविण्यात येणार असून महाविकास आघाडीकडून या मोहिमेला खतपाणी घालून सरकारला अडचणीत आणून जाब विचारणार असल्याचे दिसत आहे. या संदर्भात सरकारकडून नेमकी काय भूमिका घेतली जाते याकडेच सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.