बदलापूरच्या अत्याचार ग्रस्त बालीकांना न्याय द्या, आणि नराधमांना फाशी द्या ः सौ.राजळे
(सुनिल नजन चिफब्युरो /स्पेशल क्राईम रिपोर्टर/अहमदनगर जिल्हा) बदलापूर येथील शाळेत शिकत असलेल्या दोन शाळकरी मुलीवर एका अक्षय शिंदे नावाच्या नराधमाने अत्याचार केला. त्यानंतर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करायला गेलेल्या मुलींच्या पालकांना बारा तास तक्रार न घेता पोलीस स्टेशनला बसवून ठेवले. शाळेचा पदाधिकारी जो भाजपचा समर्थक आहे. त्याने तक्रार देउनये म्हणून अंन्यायग्रस्त मुलींच्या पालकावर दबाव आणला. या अमानुष घटनेची शासनाने त्वरित दखल घेऊन अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी व त्यांना पाठीशी घालनाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याला ही अटक करून चिमुकल्या बालिकांना न्याय द्यावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्रजी पवार गटाच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्षा सौ. योगिता शिवशंकर राजळे यांनी पाथर्डीचे तहसीलदार उद्धव नाईक यांना निवेदन दिले आहे. निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की अनेक वर्षांपासून भाजप सरकारच्या काळात विषेशतः ग्रुहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच कार्यकाळात महिलावरील अत्याचाराच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.त्यांचा गुन्हेगारावर वचक राहीलेला नाही. बहुतांश घटनामध्ये भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, दिसत आहेत.असा या निवेदनात आरोप करण्यात आला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या राजिनाम्याचीही मागणी केली आहे.या निवेदनावर स्वतः जिल्हाध्यक्षा सौ. योगिता राजळे, सविता भापकर, रत्नमाला उदमले,मनिषा ढाकणे, सपना काटे, यमुना उराडे,ज्योती उराडे, सुमन काळे, मीरा भापकर, अनिता डमाळे,नंदा खोरदे यांच्या सह्या आहेत. या प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात महीलांचा आक्रोश सुरू झाल्यामुळे बदलापूर घटनेतील सफाई कामगार असलेला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी १७ आँगष्टलाच अटक केली आहे. संबंधित अत्याचाराची घटना ही १३ तारखेला घडली होती. दरम्यान कल्याण न्यायालयातील न्यायाधिश वी.ए.पत्रावळे यांनी आरोपी अक्षय शिंदे याला २४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारी वकील आश्विनी भामरे यांनी युक्तिवाद करून आरोपीच्या पोलीस कष्टडीत वाढ केली.शाळेच्या मुख्य ध्यापिकेलाही निलंबित करण्यात आले आहे.आणि तपासात दिरंगाई केली म्हणून एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एक सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक,एक पोलीस हेडकाँन्स्टेबल अशा तिन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. या बाललैंगिक अत्याचार प्रकरणाच्या चौकशी साठी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ अधिकारी आरती सींग यांच्या नेतृत्वाखालील विषेश पथक नेमन्याची घोषणा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल असे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले. दरम्यान या घटनेचे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले असुन विरोधी पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीने शुक्रवारी २३आँगष्ट रोजी महाराष्ट्र बंद ची हाक दिली आहे.संपूर्ण महाराष्ट्रातील महिला वर्गात या घटनेने असंतोष निर्माण झाला आहे. विरोधी पक्षाकडून लाडक्या बहिणीच्या सुरक्षेची काळजी कोण घेणार म्हणून महिला वर्गातून प्रश्न उपस्थित केला जात आहे. या घटनेतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी म्हणून सरकार रँपिड अँक्शन मोडवर आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गलिच्छ राजकारण करणाऱ्या विरोधी पक्षाचेही चांगलेच कान टोचले आहेत. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे.