मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरारी संशयित मारेकऱ्यांच्या बीड पोलिसांनी मुसक्या आवळल्या़

मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरारी संशयित मारेकऱ्यांच्या बीड पोलिसांनी मुसक्या आवळल्या़, न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली !

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्सा जोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे संशयित मारेकरी शोधून काढण्यात बीड पोलिसांना अखेर यश आले असून पुण्यातील बालेवाडी परिसरात लपून राहिलेले संशयित आरोपी सुदर्शन चंद्रकांत घुले आणि सुधीर ज्ञानोबा सांगळे यांच्या शनिवारी भल्या पहाटे बीड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.त्यांना झटपट बीड जिल्ह्यातील केज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.त्यांच्या बरोबर मस्सा जोग येथील रहिवासी असलेल्या सिद्धार्थ सोनवणे यांच्या ही पोलिसांनी मुसक्या आवळून त्याला ही न्यायालयाने चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.सिद्धार्थ सोनवणे हा घटनेच्या दिवशी मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या लोकेशन चे सर्व अपडेट मारेकऱ्यांना देत होता म्हणून पोलिसांनी त्याला ही सह आरोपी केले आहे.९डिसेंबर रोजी देशमुख यांच्या हत्येची घटना घडल्या पासून सर्व मारेकरी फरार होते.या मारेकऱ्यांना बीड येथील डॉ.संभाजी वायभासे आणि त्याची वकील असलेली पत्नी हे पळून जाण्यासाठी मदत करीत होते अशी माहिती पोलिसांना मिळाली होती डॉक्टर वायभासे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी लगेचच दिलेल्या माहितीनुसार फरार आरोपी पर्यंत बीडचे पोलीस पोहोचले. आणि फरार आरोपींना बेड्या ठोकून थेट बीड येथे घेउन आले.संशयित आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांच्या बरोबरच सिद्धार्थ सोनवणे या तिघांना ही केज येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.आरोपींना प्रथम केज येथील पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले.नंतर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी साठी नेण्यात आले.वैद्यकिय तपासणी केल्यानंतर त्यांना केज न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायमूर्ती श्रीमती एस व्ही पावसकर यांच्या समोर सुनावणी झाली. न्यायालयाने तिन्ही आरोपीना चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.आरोपीच्या वतीने अँडव्होकेट तिडके यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांनी काम पाहिले. या आरोपींना पाहण्यासाठी केज पोलिस स्टेशन आणि न्यायालयाच्या परिसरामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.त्यामुळे पोलिस बंदोबस्तात फार मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली होती. जिल्हा पोलिस अधीक्षक नवनित काॅवत यांनी सर्व प्रकारच्या बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या मुळे जनतेचा जो पोलिसांच्या विरोधात जनक्षोभ उसळला होता तो आता कमी झाला आहे. खंडणी प्रकरणातून पोलिसांना सरेंडर झालेल्या संशयित आरोपी म्हणून हजर झालेल्या वाल्मिक कराड यांचेही या प्रकरणात काही धागेदोरे जुळतात की काय हे पोलिस तपासून पहात आहेत. या संशयित आरोपींनी आपण देश सोडून परदेशात नेपाळ ला गेल्याच्या अफवा पसरवून पोलिसांना हुलकावणी देण्याचा जो केविलवाणा प्रयत्न केला तो फार काळ पोलिसांसमोर टिकला नाही. “कानुन के हाथ बहोत लंबे होते है ” हे जिल्हा पोलिस अधीक्षक नवनित काॅवत यांनी सर्व सामान्य माणसाला दाखवून दिले आहे. सात आरोपी पर्यंत बीडचे पोलीस पोहोचले आहेत परंतु एक संशयित आरोपी क्रुष्णा शामराव आंधळे हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन अजूनही पसार झालेला आहे. त्याच्याही नकळत मुसक्या आवळल्या जातील असे आश्वासन बीड जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिले आहे. आतापर्यंत पोलिसांनी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, विष्णू चाटे,प्रतिक घुले या सहा मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.फक्त क्रुष्णा आंधळे हा फरार आहे. पोलिसांनी एक गाडी मालक शिवलिंग मोराळे, आणि एका सोनावणे नामक महीलेची कसुन चौकशी केली आहे. सदर खुन प्रकरणातील संशयित आरोपी हे पुण्यातील बालेवाडी परीसरात कोणत्या दोन महीलांच्या घरात वास्तव्य करून राहिले होते याचा सुद्धा पोलिस कसून तपास करीत आहेत.एकंदरीत नवीन जिल्हा पोलिस अधीक्षक नवनित काॅवत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास उकलन्यासाठी बीड पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे त्यामुळे बीड पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.